
शेतकऱ्यांना ज्यातून फायदा होतो त्यासाठी केंद्र सरकार (Central government) वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत.
मर्सिडीज कार पेक्षा महाग आहे ‘हा’ 50 लाख किंमतीचा बैल; तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे १२हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकरी आता १३व्या हप्त्याची वाट पहात होते. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी म्हत्वाची आहे. पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १२व्या हप्त्याचे पैसे देण्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल (Big change in plan) केला आहे. मात्र, या बदलाचा करोडो लाभार्थ्यांना फटका बसला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना १२वा आणि १३वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने घेतली दखल