मागच्या काही दिवसापासून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा खूप चिंतेत आहे. कांद्याबरोबरच केळीचे देखील नुकसान झाले आहे. आता विरोधकांनी अधिवेशन चालू झाल्यापासू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच धारेवर धरले जात आहे. यामध्येच आता सरकार शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका बजावत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जंयत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
देशातील पहिली कार कोणी खरेदी केली होती, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…
आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) सध्या अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जयंत पाटील म्हणाले, “अधिवेशन संपले की हे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणार असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत.
संदीप देशपांडे हल्लाप्रकरणात पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार नाही शेतकरी उभं पीक नष्ट करत आहे. आलेल्या पिकाला योग्य बाजारभाव नसल्याने त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवण्याचे वाईट दिवस शेतकऱ्यांवर आले आहेत. तरीही शेतकऱ्यांबाबत सरकार कुठलाच निर्णय न घेता शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
धक्कादायक! कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची केली गळा आवळून हत्या