आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

A bold decision was taken for farmers in today's cabinet meeting; Read in detail

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! बारामतीतील माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश; सुप्रिया सुळेंची खासदारकी धोक्यात?

सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळणार आहे.

भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, राज्यांमध्ये दंगली घडवून त्यांना…

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय –

  • आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार २५ हजार रुपये मानधन.
  • अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता
  • इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
  • मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या किती जागा? महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *