‘अशा’ पद्धतीने करा जनावरांचे पालन, मोठ्या आजारांपासून राहतील दूर

Keep animals in this way, they will stay away from major diseases

शेतकरी शेती करून त्यातून नफा मिळवत असतात. दरम्यान शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकरी (farmers) पशुपालन करून दुग्धव्यवसाय (Dairying) करण्यावर भर देत असतात. पण खूप शेतकऱ्यांना जनावरांचे (animals) योग्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती नसते? तसेच जनावरे आजारांपासून (diseases) दूर कसे ठेवावे त्याची निगा कशी राखावी? जेणेकरून आजारांपासून दूर राहतील. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

शेतकऱ्यांना जर शेतीत चांगल उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये सुपर नेपिअर, ऊस या चारा पिकांची लागवड करावी. तसेच प्रत्येक जनावरास दररोज दोन वेळा ३० किलो चारा कुट्टी द्यावी. त्यात वाळलेला चारा ८ किलो, हिरवा चारा २२ किलो प्रमाणे द्या. तसेच वाळलेल्या चाऱ्यामध्ये कडबा, हरभरा भुसकट, सोयाबीन व गव्हाचा भुस्सा द्यावा आणि ओल्या चाऱ्यामध्ये नेपिअर गवत, ऊस, कडवळ, मका आणि शेतातील काढलेले गवत ही पिके येतात.

कांद्याचा बाजारभाव कोलमडला, तरीही राज्यात कंद्याची लागवड मोठ्या प्रमाणात

तसेच जनावरांना याशिवाय दररोज दोन वेळ खुराक द्या. महत्वाची बाब म्हणजे या खुराकामध्ये सरकी पेंड, मका, गव्हाचे पीठ, कडधान्य, मीठ, कॅल्शिअम, खाण्याचा सोडा असे सर्व मिश्रण एकत्रित करून द्या. तसेच हे मिश्रण दुभत्या जनावरांना ५ किलो तर भाकड जनावरांना २ किलो प्रमाणे देणे गरजेचे.

लसीकरणावर भर द्या

शेतकरी शेतीतून उत्पादन मिळवून पैसे मिळवतात.पण शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात.मग या जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी तर घेतली पाहिजे. यामध्ये महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्याला एफएमडीचे लसीकरण करा. दरम्यान सध्या उद्भवत असलेल्या लम्पी स्कीन (Lumpy skin) या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. महत्वाचं म्हणजे पोखणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण केले जात आहे.

Raj Thackeray: “…महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

अस करा गोठ्याचे व्यवस्थापन

1) गोठ्याची स्वच्छता

शेतकरी आपल्या पशूंचे पालन गोठ्यात करतात. म्हणून गोठा स्वच्छ असला पाहिजे. गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही. या गोठ्यात खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी रचना करा. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. तसेच दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. तसेच गोठ्यात जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा, कारण चूना लावल्याने गोठा जंतूविरहित राहतो. गोठ्यात गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी. महत्वाचं म्हणजे गोठ्याबरोबर शोषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवा जेणेकरून डास होणार नाहीत.

खुशखबर! आता फक्त 750 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; आजच करा बुकिंग

2) जनावरांची स्वच्छता

जनावरांची दुधाची धार काढण्यापूर्वी त्यांना पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवा कोरड्या फडक्‍याने कास पुसून घ्या. यामुळे कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.

शेतकऱ्यांनो सावधान! लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, आख्खी पिकेच करावी लागतेय नष्ट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *