
Sharad Pawar । उल्हासनगरमधील एका कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती यावेळी शरद पवार यांनी वेगवगेळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ‘देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देणारी घटना जपली पाहिजे. आज संविधान धोक्यात आलं आहे. जर आपण जागृत राहिलो नाही तर संविधानाला धक्का लागल्या शिवाय राहणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar । अशोक चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “काहीतरी गडबड..”
वाचा शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
१) देशातला कष्टकरी माणूस अस्वस्थ आहे.
२) बाबासाहेबांनी दिलेला अधिकार नसता तर आपली परिस्थिती देखील इतर आजूबाजूच्या देशांसारखी झाली असती.
३ ) बाबासाहेबांनी हा देश उभा करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
४) एक एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसतात. त्याची चिंता आजच्या राज्यकर्त्यांना नाही
६) संविधानाच्या मूलभूत हक्कावर बोललं गेलं तर हल्ला केला जात आहे. आता हे सर्व जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अशा अनेक मुद्द्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.