धक्कादायक! समुद्रात वाहून गेली पाच मुले

Shocking! Five children were washed away in the sea

सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळी (Warali) कोळीवाड्याजवळ समुद्रात पाच मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीचा आणि मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर तीन मुलांवर खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत.

कुठलाच क्लास न लावताच झाली आयएएस अधिकारी; वाचा कृषीकन्येची यशोगाथा

वरळीतील कोळीवाडा या ठिकाणी दुपारी तीन च्या सुमारास पाच मुले समुद्रात पोहण्यास गेली होती. दरम्यान, ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याचे समजताच तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढले.

सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी

दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पीडित मुलांच्या कुटुंबांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये १० वर्षाचा मुलगा आणि १४ वर्षाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही सर्व मुले तेथील वरळी परिसरातील असल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी या मुलांच्या कुटुंबियांची भेट देखील घेतली.

धक्कादायक! आफताबच्या २५ गर्लफ्रेंड्स असल्याची माहिती आली समोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *