Crime News । पुणे : अनेकजण घरच्यांच्या संमतीने लग्न (Marriage) करतात तर अनेकजण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात. अलीकडच्या काळात प्रेमविवाह (Love marriage) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु प्रत्येकाचे कुटुंबीय त्यांना स्वीकारतातच असे नाही. पती आणि पत्नीचं इतर नात्यांपेक्षा वेगळे नाते असते. बऱ्याचवेळा त्यांच्यात लहान लहान गोष्टींवरून वाद होत असतात. (Latest Marathi News)
Sharad Pawar । पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “त्यांचा…”
अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की त्यातून काही विपरीत घडते. सध्या असेच काहीसे घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुणे शहरातील येरवडा परिसरातील आहे. रुपाली भोसले आणि आशिष भोसले यांचे मागील दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या जोडप्याला ७ महिन्यांची मुलगीदेखील आहे. त्यांचा संसार सुखात सुरु होता. परंतु त्यांच्या संसाराला नजर लागली. (Crime)
मागील काही दिवसांपासून आशिषला रुपालीच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यातून त्यांच्यात अनेकवेळा वाद झाले. याच विषयावरून त्यांच्यात शनिवारी रात्री खूप वाद झाले. रागाच्या भरात आशिषने रुपालीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर धारदार चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. परंतु तिला उपचारासाठी नेताना तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आशिष जाधवला अटक केली.
Ajit Pawar । “महाविकास आघाडी सरकार पडत होतं तेव्हा…”, अजितदादांनी केला मोठा गौप्यस्फोट