
महावितरण ( MSEB ) कडून वीजबिल आले की बिलावरचा आकडा पाहून नागरिकांना नेहमीच शॉक बसत असतो. यामुळेच शेतकरी आणि महावितरण यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. महावितरण कडून बऱ्याचदा शेतकऱ्यांना रिडींग न घेता अंदाजे वीजबिले दिली जातात. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. बीड ( Beed) मधील तर 12 हजार नागरिकांना रिडींग न घेताच अंदाजे जास्तीचे वीजबिल पाठवण्याची घटना घडली आहे. तसेच खंडाळा येथे देखील असाच प्रकार घडला आहे.
“कोणतेच महापुरूष बॅचलर नाहीत”; चंद्रकांत पाटलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आपल्याला ‘लाईटही नको आणि बिलही नको’ अशी भूमिका मांडली आहे. याशिवाय वीजेचे आकडे टाकून चोरी करणाऱ्या लोकांना महावितरणचे पाठबळ आहे . परंतु, वीज कनेक्शन घेऊन वीजबिल भरणाऱ्या लोकांवर महावितरण अन्याय करत असल्याची सल या लोकांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान घरात फक्त दोन बल्ब असूनही तब्बल 34 हजारांचे वीजबिल आल्याची घटना घडली आहे. एका मजुरी करणाऱ्या सामान्य कुटुंबाला एवढे मोठे बिल आल्याने हे बील भरायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिरुपती नावाची कंपनी रिडींग न घेता शहरात बसून अंदाजे रिडींग टाकते. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई महापालिकेमध्ये कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप