राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे लवकरच राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे ते भाजपसोबत जाणार या चर्चेला देखील उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळे सुरळीत असल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“गौतमीचा कार्यक्रम सुरु होताच महिलांनी हातात घेतल्या काठ्या अन्…” पाहा Video
भास्कर जाधव यांनी अजित पवार नाराज आहेत का? या प्रश्नाचे उत्तर अतिशय उडवाउडवीचे दिले आहे. अजित पवार ( Ajit Pawar) नाराज आहेत का? याबाबत खुद्द अजित पवारांनाच विचारा असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. नितेश राणेंना मातोश्रीवर टीका करण्याशिवाय दुसरे काही येत नाही. गेल्या सात वर्षात त्यांनी एकतरी सभा घेतली आहे का ? असा सवाल देखील भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) यांनी उपस्थित केला आहे.
महिंद्रा थार खरेदी करणाऱ्यांसाठी समोर आली वाईट बातमी!
पवार कुटुंबियांची एकी हेच त्यांच्या यशाचे कारण आहे असे म्हंटल जात. मात्र अजित पवार भाजपसोबत जाणार का? या चर्चेने या एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता, त्यांनी सरळ सरळ यावर बोलणेच टाळले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! IPL चालू असतानाच क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ