
बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. साईबाबांविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, मात्र तो देव नसतो. आता मी हे बोलल्यावर लोक यावरुन वाद घालतील,मात्र हे सांगणे देखील अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलं होते.
मित्रासोबत फिरायला जाणं तरुणीला पडलं महागात!
त्याचबरोबर “साईबाबा हे संत किंवा फकीर असू शकतात मात्र देव असू शकत नाही. तिथे हिंदू पद्धतीने पूजा होत असली तरी कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही. असं देखील ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलीच खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांनी आता या विधानाबद्दल माफी देखील मागितली आहे.
ब्रेकिंग! IPL सुरु असतानाच क्रीडा विश्वावर शोककळा; टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचं निधन
यावेळी माफी मागताना बागेश्वर बाबा म्हणाले, “शंकराचार्यांनी जे सांगितले होते, मी त्याचा फक्त पुनरुच्चार केला. मात्र आता आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे माझ्या बोलण्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मला मनापासून खूप वाईट वाटते. असे बागेश्वर बाबा म्हणाले आहेत.
“फोटो बघून गुन्हे दाखल होतील…” गौतमी पाटीलचा कार्यक्रम अचानक बंद; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?