
राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“…अन्यथा चित्रपटगृहांना आग लावू; शाहरुखचा ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात, महंतांनी दिला इशारा
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, ते लवकरात लवकर कोसळणार आहे. असं त्यांनी म्हणत भाजपसारखा मुर्ख पक्ष आजपर्यंत पाहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
“हसावे का रडावे कळत नाही…”, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
दरम्यान, राऊतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर देखील सडकवून तिला केली आहे. ते म्हणाले, ” राज्यपाल कोश्यारी यांना एक मिनिटं सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही”. पुढे राऊत म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयामध्ये बसले आहेत हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे”.