
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अजित पवार यांनी नेमका कुणाला डोळा मारला? सोशल मीडियावर होतेय ‘त्या’ व्हिडिओची जोरदार चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पमध्ये (Maharashtra Budget) शेतकऱ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना मागच्या काही काळापासून बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे.
मागच्या बऱ्याच काळामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही योजना नव्याने राबवण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 आणि 2023 साठी डीबीटीद्वारे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शेतकऱ्याची थट्टा! वांग्याला प्रति किलो मिळाला फक्त 27 पैसे दर