
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरून केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह वाढल्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू होती. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. यापार्श्वभूमीवर शरद पवारांनी मावळ भूमिका घेत आणखी एक नवीन वक्तव्य केले होते.
ब्रेकिंग! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता संजय दत्त गंभीर जखमी
दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीमध्ये 20 पक्षांनी एक सामायिक आघाडी स्थापन करून अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावेळी सर्वच पक्षांनी जेपीसीची मागणी केली. परंतु, मुंबईमध्ये आल्यानंतर शरद पवारांनी वेगळेच वक्तव्य केले. मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. नंतर शरद पवार म्हणाले की, 19 पक्षांना जेपीसी हवी असेल तर राष्ट्रवादीला आक्षेप नाही.
“एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! आदित्य ठाकरे यांनी केला मोठा गौप्यस्फोट
जेपीसी (JPC) स्थापन केल्यास संसदेतील संख्याबळ लक्षात घेता, त्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपचे बहुमत असणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या निकालावर शंका निर्माण होईल असे शरद पवारांचे (Sharad Pawar) म्हणणे होते. मात्र या भूमिकेला विरोध झाल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका बदलली असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.