सध्या तरुणांमध्ये एकच नाव आपल्या ऐकायला मिळत आहे ते म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil).सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये गौतमीचा कार्यक्रम झाला तिच्या या कार्यक्रमाला तरुणांची अफाट गर्दी होती. तिचा हा कार्यक्रम बेडग गावातील जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.
यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली. त्यामुळे चर्चेत आलेल्या गौतमी पाटीलचीची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात गौतमीने एक खुलासा केला त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती म्हणाली, माझ्या कार्यक्रमाला लोकांनी एवढी गर्दी केली होती मला याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती.
मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे अचानक निधन
नंतर एका पत्रकाराने तुम्ही राजकारणात येणार का असा सवाल केला? यावर उत्तर देत गौतमी म्हणाली, “राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही, राजकारणापासून मी लांबच आहे”. पुढे ती म्हणाली, सध्या मी जे करत आहे तेच पुढे अजून चांगले करण्याचा प्रयत्न करणार आहे.