महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षाच्या निकाला लागला आहे. जर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असं सगळ्यात मोठं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. यामुळं सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
त्याचबरोबर तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत आहोत, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.
त्याचबरोबर तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढताना बहुमत चाचणी बोलावणं गरजेचं नव्हतं, असा दणका देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.