Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! पुन्हा एकदा राजकीय भुकंप, ‘इतके’ आमदार करणार शिंदे गटामध्ये प्रवेश

Breaking! Once again a political earthquake, 'so many' MLAs will enter the Shinde group

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. अशातच आमदार बच्चू कडू (Buchchu kadu) यांनी मोठ विधान केल आहे.

महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आगामी काळात शिवसेनेचा ठाकरे गट (Thackeray Group) वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रसह देशभरातील जनतेचं लक्ष आगामी घडामोडींकडे वेधल जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“अजितदादांना मुख्यमंत्री करायचं”, आमदार निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत

तसेच, राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जात आहे. तर दुसरीकडे 20 ते 25 आमदार जरी इकडचे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “पंतप्रधानांची किंमत…”

पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुढे जात आहे. मात्र, पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी काॅंग्रेसच्या नेते मंडळींनी प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.

अदानी हिडेंनबर्ग प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी; सेबीला दिले महत्त्वाचे आदेश

दरम्यान, शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन आठ महिने उलटून गेली आहेत. पण अद्यापही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी आजही नाराजी व्यक्त केली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच भाजपने दिली खुली ऑफर!

Spread the love
Exit mobile version