Accident News । सोलापूर : मागील काही दिवसांपासून अपघाताचे (Accident) प्रमाण खूप वाढले आहे. वाढत्या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकांमुळे होतात. सध्या असाच एक भीषण अपघात (Bus bike accident) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)
Salman Khan । हे काय? सलमानने अभिषेकला मारली मिठी, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या राय…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी-धाराशीव महामार्गांवर हा अपघात (Barshi-Dharashiv accident) झाला आहे. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. बार्शीहून धाराशिवकडे जाणाऱ्या बस (Bus accident) आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. बस रस्त्याच्या कडेला एका बाजूला झुकली. यात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. बस खाली चिरडून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बसचा आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या महामार्गावर किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघाताची संख्या वाढल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
New Year Gift । मद्यप्रेमींसाठी खुशखबर! नाताळ-नववर्षाच्या रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार वाईन शॉप