
अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या अवस्था देखील खूपच वाईट झाल्या आहेत. सध्याच्या काळात समृद्धीसारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची फार गरज आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
सलमान खान अडकणार लग्नबंधनात? भर गर्दीत महिलेने घातली लग्नाची मागणी, व्हिडिओही झाला व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर असेच अनेक प्रकल्प राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येतील.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
जेऊर कुंभारी शिर्डी पथकर प्लाझा येथिल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी अनेक मंत्री तिथे उपस्थित होते. त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी काही स्वप्न पाहिली होती. जी स्वप्न समृद्धीच्या रुपात पूर्ण होत आहेत.
हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी