
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विरोधी पक्षाकडून अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईमधील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान ठाकरे गटाने सुद्धा सामनाच्या अग्रलेखातून सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
मोठी बातमी! एमसी स्टॅनवर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; पाहा Video
वाघासारख्या असणाऱ्या महाराष्ट्राची ( Maharashtra) शेळी करून तिच्या शेपटाशी खेळण्याचे तंत्र दिल्लीकडून सुरू आहे. ही गोष्ट घातक आहे. त्यांनी महाराष्ट्रातून वस्त्रोद्योग आयुक्तालय पळवले आणि बदल्यात ‘बुकी’ अनिल जयसिंघानीला व्हाया गुजरात मुंबईलापाठवले. ‘वॉन्टेड बुकी’ पकडण्यासाठी गृहमंत्र्यांनी जेवढा आटापिटा केला, तेवढा आटापिटा वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबईतच ठेवण्यासाठी करायला हवा होता. किमान राज्याचे कल्याण तरी झाले असते. असे म्हणत ठाकरे गटाने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
शेवटी नाद पूर्ण केलाच! स्कूटर घेण्यासाठी सहा वर्षांपासून साठवली 90 हजाराची चिल्लर; व्हिडीओ एकदा बघाच
राज्य सरकारने वेदांत-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, टाटा एअर बस यांसारखे मोठे व महत्त्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला न्हेले. एवढेच नाही तर मुंबईच्या बीकेसीत होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधील गांधीनगरला न्हेऊन ठेवले. एअर इंडियापासून ते पेटंट डिझाइन ट्रेडमार्क ऑफिसपर्यंत अनेक महत्त्वाची व मोठी राष्ट्रीय कार्यालये मुंबईतून बाहेर गेली. इतिहासात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तसे मुंबईचे (Mumbai) वस्त्रहरण रोज सुरू आहे.
लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार, अदानींना पुन्हा धक्का बसणार? चर्चांना उधाण
एवढे कमी होते म्हणून आता मुंबईयेथील वस्त्रोद्योग आयुक्तालयही पळवून नेले. मुंबईतून सर्व काही ओरबाडून नेणे व त्यातून मुंबई उद्ध्वस्त करणे हाच सरकारचा डाव आहे. म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवले आहेत. अशी बोचरी टीका ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे.