
भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. चीनमध्ये ( China) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने तिथली परिस्थिती बिकट झाली आहे. भारतात आता कुठे सर्व गोष्टी सुरळीत झाल्या असून आता पुन्हा कोरोना येणार की काय ? या चिंतेत लोक आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टर रवी गोडसे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी भारताला घाबरण्याची गरज नाही. असे सांगितले आहे.
हिवाळी अधिवेशनात अजित पवार शांत; आमदार नाराज
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये लोकांनी कोरोनाच्या लसी घेतल्या आहेत. यामुळे भारताला आता कोरोनापासून कुठलाच धोका नाही. कोरोना ( Corona) आला तरी त्याला अजिबात घाबरू नका. निधड्या छातीने कोरोनाला सामोरे जा. असे म्हणत डॉक्टर रवी गोडसे ( Dr. Ravi Godse) यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मोठी बातमी! भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
एखाद्या गुराला ३ महिन्यांपासून बांधून ठेवलं असेल तर ते जोर दाखवतेच. याआधी सुद्धा आपण कोरोनाचा सामना केला आहे. सर्वांनी लसी घेतल्या आहेत. फक्त एक-दोन नाही तर तीन-तीन डोस लोकांनी घेतले आहे. यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नसल्याचे रवी गोडसे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना आता आला तरी तो त्याचे भयानक रूप दाखवणार नाही अशी माहिती देखील त्यांनी दिली.
सोलापुरात नवरदेवांचा मोर्चा; लग्नाला मुलगी मिळावी यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी