मुंबई : काल (रविवारी) दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. यावेळी कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उठून गेलेले दिसले. त्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी वॉशरूमलाही जायचं नाही का? असा मिश्किल प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला त्याचबरोबर माध्यमांनी वस्तुस्थितीवर आधारित बातम्या द्याव्यात, असा सल्ला देखील दिला आहे.
या अधिवेशनामध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची पुढील धोरणं आणि पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे मी तिथे बोललो नाही,पण माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेयावेळी देखील गळा अर्थ काढला,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, मागच्या दोन वर्षात कोरोना संकट असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आलं नाही. महाराष्ट्रासह देशात देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोनाच संकट दूर झालं आहे. त्यामुळे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशनं घ्यावीच लागतात. असा देखील उल्लेख अजित पवारांनी केलाय.
Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे 2 तास बैठक, ‘या’ विषयांवर चर्चा