
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालेले जवळपास तीन महिने झाले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Minister) नावे जाहीर केली आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं.
तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, आकडेवारी पाहून व्हाल चकित! वाचा सविस्तर
यावेळी रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. आठवले म्हणाले की,”देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फक्त 6 नाही 12 जिल्हे सांभाळू शकतात. एवढंच काय ते पूर्ण महाराष्ट्र सक्षमपणे संभाळू शकतात” असं आठवले म्हणाले आहेत.
Akshay Kumar: मुलीच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली खास पोस्ट; म्हणाला, “आज तू दहा वर्षांची…”
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. पालकमंत्र्यांची ही यादी पुढच्या अडीच वर्षांसाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांनादेखील काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याती शक्यता आहे.