
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Return Rain) राज्यासह औरंगाबाद (Aurangabad) मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अशातच राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची (Financial Help) गरज असतांना देखील फक्त घोषणा केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने चक्क स्मशानभूमीतच (cemetery itself) दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केल आहे.
…तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार; काय आहे कारण?
यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान शेतकरी प्रशासनाला निवेदन देत म्हटले की, अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र समोर आहे. दरम्यान अशात दिवाळीचा (Diwali Festival) सण आला आहे. आण आमच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नाहीत. म्हणून आज गावातील सर्व शेतकरी स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा
आम्हाला पंधरा दिवसांत नुकसानभरपाईची मदत द्या
यावेळी बोलतांना शेतकरी म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा कृषिमंत्री पद मिळाले आहे. दरम्यान मात्र असे असतानादेखील ओला दुष्काळ सारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सांगत आहेत. मुळात त्यांनी इथ येऊन आमच्या भागात काय परिस्थिती आहे हे पाहावे. इथ आमच्या कापसाच्या झाडाला फक्त दोन कैऱ्या लागल्या आहे. मग आता आम्ही दिवाळी साजरी कशी करणार असा आम्हाला प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.इतकंच नाही तर राज्य सरकारचे आमच्यावर अजिबात लक्ष नाही. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत सरकराने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.
तरुणांनो सावधान! आता ‘आयटम’ शब्द वापराल तर येईल होईल शिक्षा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?