
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, राखीच्या लग्नाबद्दल तिचा पहिला पती रितेश याने प्रतिक्रिया दिली आहे.
दौंडच्या घटनेबाबत मोठी अपडेट; पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेश म्हणाला, “राखी सर्वकाही प्रसिद्धीसाठी करते, सहानुभूती मिळविण्यासाठी करते. मी एवढेच सांगेन की ती जे सांगत आहे ते १००% फक्त मसाला आहे आणि बाकी काहीही नाही.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्याबरोबर आता साताऱ्यामध्ये कोयता गॅंगची दहशद
त्याचबरोबर पुढे तो म्हणाला, “कधी ती ख्रिश्चन बनते तर कधी मुस्लीम बनते हे तुम्ही पाहिलं असेलच असं तो म्हणाला. दरम्यान, राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वाना याबाबत माहिती दिली आहे.
“वादळ येत आहे…”, रितेश देशमुखचे पठाण चित्रपटाबाबत केलेले ट्विट चर्चेत