सध्या तरुणांमध्ये एकच नाव आपल्या ऐकायला मिळत आहे ते म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil).सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये गौतमीचा कार्यक्रम झाला तिच्या या कार्यक्रमाला तरुणांची अफाट गर्दी होती. तिचा हा कार्यक्रम बेडग गावातील जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.
सरकारला लाज वाटली पाहीजे, राजू शेट्टींची बोचरी टीका
यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली. त्यामुळे चर्चेत आलेल्या गौतमी पाटीलचीची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात गौतमीने एक खुलासा केला त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती म्हणाली, माझ्या कार्यक्रमाला लोकांनी एवढी गर्दी केली होती मला याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती.
मोठी बातमी! गौतमी पाटील राजकारणात येणार का? चर्चाना उधाण
यावेळी गौतमीने मिरजमधील शो चा धक्कादायक अनुभव देखील शेअर केला. गौतमी म्हणाली, मिरजच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यावेळी काहींनी काठ्या देखील फेकून मारल्या. तरीही आम्ही कार्यक्रम थांबवला नाही. या कार्यक्रमामध्ये एकाच मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळाली. यावरूनही गौतमी पाटीलने खेद व्यक्त केला.