
भारत हा कृषिप्रधान देश आहे. दरम्यान देशात शेतीसह पशुपालन हे देखील उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्याचे सिद्ध होत आहे. शासनाकडून ग्रामस्थांना पशुसंवर्धन (animal husbandry) क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक (Financial Investment) करण्यासाठी प्रोत्साहन दिले जातय. यामध्ये मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 2022 च्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.
Rakhi Sawant: “मला मुख्यमंत्री बनवा”, राखी सावंतने केली अजब-गजब मागणी, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान यासाठी शेतकऱ्यांना (Agriculture) तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी https://awards.gov.in वर अर्ज मागविण्यात आले आहेत .पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून पशुपालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांनी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
बापरे! चक्क म्हशींनी फोडलं वंदे भारत एक्सप्रेसचं नाक, 147 कलमानुसार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
पुरस्कार तीन गटात दिले जाणार
दरवर्षी राष्ट्रीय गोकुळ किसान मिशन योजनेंतर्गत तिन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पारितोषिके दिली जातात.पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग प्रत्येक श्रेणीतील गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुरस्कार विजेत्यांना ठराविक रक्कम देते.
1) प्रथम पारितोषिक म्हणून 5 लाखांची रक्कम
2) द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख
3) तृतीय क्रमांकास दोन लाख
Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील राम मंदिराबाबत दिली महत्वाची माहिती
गोपाल रत्न पुरस्कारासाठी आवश्यक पात्रता
1) देशी गायी आणि म्हशींच्या (50 गायी आणि म्हशींच्या 17 प्रमाणित जाती) सह दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी
2)देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रशिक्षित कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
3)दूध उत्पादक कंपन्या (दररोज 100 लिटर दूध उत्पादन करतात)
4) दूध सहकारी संस्था
5) MPC किंवा FPO (50 शेतकरी सदस्य)