गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) खरिपातील कांद्याचे (Kharif onions) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जीव रडकुंडीला आला आहे. कारण सध्या कांद्याला मिळत असलेल्या भावामध्ये कांदा (Onions) लागवडीला आलेला खर्चही निघत नाही. महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेशात कांद्याची अवस्था वाईट झाली आहे. कारण येथे कांदा शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने कांदा विकावा लागतोय.
कांद्याची अवस्था पाहून भाजी मंडईशी संबंधित लोकही चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान आता लवकरच कांद्याच्या किमती कडाडणार आहेत. भाजी मार्केट आळी असोसिएशनचे अध्यक्ष खुशी राम लोधी यांनी सांगितले की, एकूण कांदा उत्पादनात कांद्याचा वाटा 70 टक्के आहे, तर खरीप कांद्याचा वाटा 20 टक्के आहे आणि उशिरा कांद्याचा वाटा 10 टक्के आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आणि यामुळे का कांद्याची मुळे खराब होत आहेत.
त्याचा तोटा म्हणजे खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन कमी होईल. महाराष्ट्र, कर्नाटकात याआधीच भरपूर पाऊस झाला आहे. बिहार, उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून पावसाने परिस्थिती दयनीय बनवली आहे. शेतकऱ्यांना सध्या बाजारात 10 ते 15 रुपये किलो कांद्याला भाव मिळत आहे. दरम्यान याच कांद्याची बाजारात 25 ते 30 रुपये किलोने विक्री होत आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कांद्याला फटका
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांदा जास्त आला किंवा उत्पादन घटले. दरम्यान त्याचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येतो. कारण यंदा खरीप हंगामात कांदा 20 ते 30 टक्के अधिक आहे. पावसामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांद्याला अधिक फटका बसला आहे. या राज्यांमध्ये उत्पादन घटले तर साहजिकच कांद्याचे भाव वाढतील.
Eknath Shinde: ‘पीएफआय’वर भारतात बंदी! एकनाथ शिंदेनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कांद्याचे 2021-22 मध्ये विक्रमी उत्पादन
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये 266 लाख टन कांदा होता. 2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 19 टक्क्यांनी वाढले. त्यात वाढ होऊन ती 317 लाख टन झाली. त्यातच एक विक्रम केला. विक्रमी उत्पादनामुळेच कांदा स्वस्त झाला. दरम्यान
यावेळी कांद्याचे भाव महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतो.
Eknath Shinde: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे