
शेती करायची म्हटल की दिवसभर मेहनत देखील करावे लागते. शेती करणाऱ्याला मेहनती शिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. शेतामध्ये शेतकऱ्यांसोबतच त्याच्या घरच्यांना देखील तेवढेच दुःख सोसावं लागतं. तसेच शेतकऱ्यांना ऊन ,वारा ,पाऊस यांसारख्या नैसर्गिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशाच परिस्थितीमध्ये एका शेतकरी जोडप्याची परिस्थिती काही क्षणातच बदलून गेली.
ही गोष्ट पुण्यातील शिरूरमधील चांडोह येथील तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार या दोघांची आहे. हे दोघेही शेतामध्ये कांदा काढण्याचे काम करत होते. व त्यावेळी त्यां दोघांच्याही आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. तुषार शेलार हा गेल्या चार वर्षापासून पोलीस भरतीचा अभ्यास करत होता. व त्याला अभ्यासासाठी जोडीदार म्हणून त्याची बायको देखील त्याच्यासोबत अभ्यास करू लागली. त्यानंतर दोघांनीही यावर्षी परीक्षेसाठी हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही कुटुंबामधील त्यांची जबाबदारी देखील चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यावेळी पहिल्या लिस्टमध्ये दोघांचेही नाव आलं नाही.
यानंतर ते लिस्टची वाट बघतच त्यांनी शेतामध्ये कांदा काढणी सुरू केली. एका दिवशी ते रानात कांदा काढत होते त्यावेळी पोलीस भरतीची शेवटची यादी जाहीर झाली. त्यावेळी त्या दोघांचे पोलीस बनण्याचे स्वप्न हे साकार झाले. यानंतर तुषारने आनंदाने त्यांच्या पत्नीला उचलून घेतले. त्यांची मेहनत व श्रेय पाहून कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू वाहू लागले. त्या दोघांचेही पोलीस होण्याचे स्वप्न होत आणि ते पूर्ण देखील झाले. या शेतकरी कुटुंबाची कहाणी खरोखरच खूपच प्रेरणादायी आहे.