
काल महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाचा अर्थात बारावीचा (HSC) निकाल जाहीर झाला. यंदाचा बारावी बोर्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. यामध्ये कोकण (Kokan) विभाग आघाडीवर आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. दरम्यान राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपले गुण कमी वाटत आहेत. आपण पेपरमध्ये लिहिल्यापेक्षा आपल्याला कमी गुण मिळालेत अशी भावना बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे. ( Paper rechecking process of HSC )
Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा झटका बसणार? राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला
मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर रिचेकिंगला देऊन मार्क वाढवून घेण्याची संधी आहे. याला पेपरचे पुनर्मूल्यांकन करून घेणे म्हणतात. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून येत्या २६ मे पासून अर्ज करू शकतात. तसेच पेपर रिचेकिंगसाठी ऑनलाइन शुल्क देखील भरावे लागते.
झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! केवळ अडीच लाख रुपयांमध्ये मिळणार घर
पेपर रिचेकिंगला देण्याची प्रक्रिया
१) पेपर रिचेकिंगला देण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.
२) यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.
३) अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत.
४) यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत.
५) यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! चुकीचा टाईप झालेला मेसेज करता येणार एडिट; जाणून घ्या सविस्तर…
महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपरची फक्त छायांकित प्रत हवी असेल तर त्यासाठी ४०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. तसेच पेपरचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर त्यासाठी ३०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. पुनर्मूल्यांकन संबंधित महत्त्वाच्या तारखा बोर्डाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.