
शेतकरी मुलगा म्हंटल की आजकाल लग्नाचे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षा वाढत आहेत. यामुळे शेतकरी मुलांचे लग्न होणे अवघड झाले आहे. लग्न होत नाही. शिक्षण आहे, शेती आहे, पैसा आहे, सर्व असून देखील लग्न होत नसल्यामुळे एका शेतकरी मुलाने एक अनोखे आंदोलन केले आहे. सध्या या आंदोलनाची सगळीकडे चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा विकास आणि…”
या मुलाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे अनोखे आंदोलन केलेला मुलगा नाचणखेडे, ता. पाचोरा येथील दहा एकर बागायती शेतीचा मालक आहे. त्याचबरोबर त्याचे बीएस्सी ॲग्रीचे उच्च शिक्षण देखील झाले आहे. पंकज राजेंद्र महाले असे या तरुणाचे नाव आहे.
या तरुणाचे चांगले शिक्षण देखील झाले आहे मात्र नोकरी नसल्याने त्याला लग्नासाठी मुलगी भेटत नाही. हा बागायतदार शेतकरी पुत्र असूनही मुलगी मिळत नाही. मग शेतकऱ्यांच्या पोरांनी लग्न कुणाबरोबर करायचे? यासाठी तरुणाने अनोखे आंदोलन केले आहे. सध्या त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
Bollywood | बॉलिवूड मधील सासऱ्याची आणि सुनेची ‘ही’ अधुरी प्रेम कहाणी वाचून तुम्हालाही होईल दुःख!