
सत्ताधारी भाजप (BJP) पक्षाला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र मोट बांधत आहे. महाविकास आघाडीकडून अगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी पुन्हा कधीच सत्तेत येणार नसल्याचं म्हंटल आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील सणसणीत टीका केली आहे.
पत्नीने पतीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, अन्… व्हिडीओ पाहून बसेल धक्का
मी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडला. त्यामुळे त्या पक्षामध्ये काय चालले आहे ? यावर मी भाष्य करणार नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी यापुढे कधीही सत्तेवर येणार नाही असे मी खात्रीने सांगतो आहे. असे उदय सामंत म्हणाले आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ नव्हे, तर ८ टक्क्यांनी झाली वाढ
दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागामधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर , शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी काँग्रस तिसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस चौथ्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाचव्या क्रमांकावर होता. त्यामुळे संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात काहीही लिहिले तरी परिणाम काय असतो हे लोकांनी दाखवून दिले आहे.
ऐकावं ते नवलच! अंडरवेअर वरून शेजाऱ्यांमध्ये भांडण, ८ जण जखमी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
विषाणू कोण आहे हे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालामधून स्पष्ट झाले आहे. कृषी उत्पन्न समितीत सुद्धा भाजपाला आणि आम्हाला मिळून ४५ टक्के जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी सामनातून लिहित रहावं महाराष्ट्र त्यांची दखल घेत नाही. असे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.