
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. या बंडानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. ठाकरेंकडील अनेक विश्वासू आमदार, खासदार यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान आता महाविकास आघाडीतील काही नेते भाजप व शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी केला आहे.
येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील काही नेते भाजपमध्ये येणार असून महाविकास आघाडी पक्ष रिकामे होतील. शिवसेनेमधील अनेक लोक मुख्यमंत्र्याच्या संपर्कात आहेत असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
चंद्रशेकर बावनकुळे पुढे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल अशी नावे आहेत. हे लोक लवकरच भाजमध्ये येणार आहेत. आता फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं बाकी आहे”. सध्या बावनकुळे यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा