Manoj Jarange Patil । पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाबाबत सर्वात मोठे वक्तव्य!

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी हा दावा खोडून काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांचा दावा खोडून काढला आहे. नुसत्या चर्चा सुरू आहेत अजूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताच तोडगा निघालेला नाही असं मनोज जरांगे पाटील म्हटलंआहे. चार महिन्यापासून जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अजूनही सुरू आहे.

Rajan Salvi । ब्रेकिंग न्यूज! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आधी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी सरकार करत नाही. सरकार तोडगा निघाला म्हणून दिशाभूल करत आहे. मी मरेपर्यंत मागे हटणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

Mumbai Crime । इंजीनियर तरुणाचं धक्कादायक कृत्य! अभिनेत्रीचे न्यूड फोटो तिच्याच कुटुंबीयांना पाठवले

आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत. आज देखील चार वाजता पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि आमदार बच्चू कडू येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASER Report 2024 । दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत सर्वेक्षणात धक्कादायक बातमी समोर!

Spread the love