नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Panchnama of damaged farmers' crop as soon as possible; Directed by Eknath Shinde

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडला आहे. सध्या शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. यामध्येच आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी राजा दुहेरी संकटात सापडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवलेला देखील भिजला आहे. आधीच कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर फळे पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

‘या’ गावात होळी दिवशी घडली होती मोठी दुर्घटना, म्हणून ७० वर्षांपासून खेळली जात नाही होळी; वाचा सविस्तर

याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची सर्व माहिती घेतली. त्याचबरोबर लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सनी देओलने अहमदनगरमधील शेतकऱ्यासोबत मारल्या गप्पा; पाहा VIDEO

दरम्यान, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, धुळे, नंदुरबार, पूर्व विदर्भ, मराठवाडा, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ७ मार्चला गारपिट होण्याची देखील शक्यता आहे.

चक्क गावाचं काढले विक्रीला; नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावातील लोकांनी घेतला टोकाचा निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *