Sharad Pawar । या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवडणुकीत टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी तयार करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसलं. मागच्या काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम ठोकत भाजप सोबत गेले.
त्यामुळे आता इंडिया आघाडीत पुढे काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात काय होणार? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील वादविवादावर मोठं भाष्य केलं आहे. इंडिया आघाडीत काही ठिकाणी वाद आहेत मात्र ते वाद मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. असे शरद पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय, असं शरद पवार म्हणाले. सध्या शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील सद्यस्थितीवर भाष्य केले आहे.
Virat Kolhi । विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म