Sharad Pawar । सध्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवार देखील ॲक्टिव झाले आहेत. शरद पवार यांनी अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात महासभा घेतली आहे. या सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना मोठं वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान मोदी यांचा अस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगलं राज्य चालवतात, मात्र पंतप्रधानांना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांना देखील 16 नोटीस पाठवल्या. त्यामुळे आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल” असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या पिकांची किंमत पडत नाही. खर्च अधिक उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर शेतकरी कर्जबाजारी होतो. आणि कर्जामुळे तो शेतकरी आत्महत्या करतो. हे चित्र फक्त राज्यात नव्हे तर देशात देखील असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.