
देशात थंडी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बऱ्याच थंडी (cold) वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आपण ऐकून असतो. सध्या अशीच काही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी घडली आहे. जास्त थंडीमुळं हृदयविकाराचा झटका (heart attack) १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवसेंदिवस थंडी वाढतच चालली आहे त्यामुळं डॉक्टरांनी नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला असून पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडीमुळे मानवी जीवनावर परिणाम होत असून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
Pune: पुणे येथील काही खासगी आयटी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत उत्तराखंड, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज राजस्थान, चंदीगड, हरियाणा आणि दिल्लीमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवली आहे.
उर्फी जावेदच्या संपत्तीबद्दल वाचून तुम्हाला ही बसेल धक्का; ‘ही’ गोष्ट करून कमावले कोट्यवधी रुपये!