
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातुन सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीमध्ये ४० लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. (A shocking incident has come to light from Malappuram district in Kerala.)
Wtc Final 2023 | टीम इंडियाला मोठा दिलासा; केएल राहुलच्या जागी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड
या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक लोकं अजूनही नदीत बेपत्ता असल्याचेही माहिती समोर येत आहे. आता नदीत बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar । अजित पवार ऑन फायर! म्हणाले, “राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय येतं?”
या ठिकाणी लोकांची मदत करण्यासाठी मच्छिमार लोक आणि त्या ठिकाणचे स्थानिक लोक देखील प्रयत्न करत आहेत. या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तेथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोक बसल्याने बोट बुडाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? शरद पवार म्हणाले, “कोणी तरी गांभीर्याने…”
या घटनेमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे मंत्री व्ही. अब्दुररहिमन यांनी दिली आहे. त्याचबरोबर या १५ जणांमध्ये ४ मुलांचा देखील समावेश आहे.