
सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. महाराष्ट्रामध्ये रोज नवनवीन गुहन्यांबाबत माहिती आपल्याला मिळत आहे. दरम्यान सध्या मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या १८ वर्षांच्या तरूणीची मंगळवारी चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतीगृहात हत्या झाल्याची आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Churchgate Hostel Murder Case)
कोल्हापूरच्या घटनेवर ठाकरे गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधी पक्ष कधीही मागे…”
या प्रकरणाबाबत पोलीस सखोल चौकशी करत असून अनेक नवनवीन माहिती देखील समोर येत आहे. आता पुन्हा एकदा या प्रकरणाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणींने एका मराठी वृत्तवाहिनीनीशी बोलताना या प्रकरणाबाबत मोठी माहिती दिली आहे.
“मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार” – शरद पवार
मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणी म्हणाल्या, आमच्या मैत्रिणीने तिच्यासोबत होत असलेल्या गैरवर्तनाची वारंवार तक्रार केलीहोती . मात्र वार्डननं या तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळं आमच्या मैत्रीणीला जीव गमवावा लागला असल्याचं मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणी म्हणाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपीने मंगळवारीच पहाटे मरीन लाईन्स रेल्वे मार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.
पावसाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट; पुढील दोन तीन दिवस महत्वाचे