
सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात मृतदेह आढळल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, यामध्ये कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या दौंड (Daund) घटनेने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ
ही घटना नक्की अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित राहिला असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. मयत झालेले कुटुंब बीड आणि उस्मानाबाद जिह्ल्यातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबामधील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यामध्ये चार मृतदेह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद देखील करण्यात आले आहे.
बाळासाहेबांमुळे मी स्वतःचा पक्ष काढू शकलो; राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना
हे मृतदेह एकाच दिवशी सापडले नसून टप्प्याटप्प्याने सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणा या घटनेची चौकशी करत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि के एल राहूल अडकले लग्नबंधनात