धक्कादायक! शैक्षणिक सहलीला गेलेले विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले

Shocking! Students who went on an educational trip drowned in the sea at Raigad

सध्या बऱ्याचशा शाळा- महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे ( Educational Trip) आयोजन केले जात आहे. दरम्यान औरंगाबाद ( Aurangabad) जिल्ह्यातील सानेगुरुजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल रायगड येथे गेली होती. यावेळी एक धक्कादायक घटना घडली असून सहा विद्यार्थी समुद्रात बुडाले होते.

रोहित पवारांची निवड परंपरेला नुकसान करणारी – राम शिंदे

शाळेतील 70 विद्यार्थी व 5 शिक्षकांसोबत ही सहल रायगडच्या काशीद बिच (Kashid Beach) वर गेली होती. मुरूड जंजिरा येथील काशीद समुद्रामध्ये यातील 6 विद्यार्थी बुडाले होते. यातील चार विद्यार्थ्यांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान उरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अजूनही बेपत्ता आहे.

इंदुरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला मोठा धक्का!

काल ( दि.9) दुपारी 12 वाजता सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी पाण्यासोबत खेळत खेळत खोल समुद्रात गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव कदम, रोहन बेडवाल, कृष्णा पाटील, सायली राठोड, तुषार वाघ, रोहन महाजन अशी या विद्यार्थ्यांची नावे असून यापैकी प्रणव कदमचा मृत्यु झाला आहे. तसेच रोहन बेडवाल हा अजूनही बेपत्ता आहे.

यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी चान्स नाहीच; स्कॉड पूर्णवेळ राहणार हजर

यामधील उर्वरित विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात ( Aalibag District Hospital) उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार; विजेत्याला मिळणार महिंद्रा थार!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *