
सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये इंस्टाग्राम तर एक लोकप्रिय अँप बनले आहे. लहान, तरुणांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण इंस्टाग्रामच्या आहारी गेल्याच दिसत आहे. काही लोक यावर रिल्स पाहून मनोरंजन करतात तर काही लोक रिल्स बनवत असतात. सध्या एक धक्कदायक घटना घडली आहे. रिल्स बनवणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले असून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रानबाजार’मध्ये गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीने केलं मोठं विधान; म्हणाली, “आत असलेला माल…”
सध्या दिल्लीत दोन तरुणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे. हे दोन तरुण रेल्वे रुळावर व्हिडीओ शूट करत यावेळी रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तेथील स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंश शर्मा आणि मोनू अशी या दोघ मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण अनुक्रमे २३ आणि २० वर्षांचे आहेत. दरम्यान, ही धक्कादायक घटना २२ फेब्रुवारीला घडली आहे.
कसबा, चिंचवडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस; शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात