पुणे : देशभरात महागाई प्रचंड वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. याचा आढावा घेऊन आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक बोर्डानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बोर्डानं शैक्षणिक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचा विद्यर्थ्यांना फायदा होणार आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले, वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संचालक बोर्डाने शैक्षणिक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधी देशांतर्गत शिक्षण घेताना १५ लाख रुपये कर्ज मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना ३० लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी ४० लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मका पिकावरील लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी करा ‘या’ उपाययोजना ; वाचा सविस्तर माहिती
- Sanjay Shirsat : संजय शिरसाटांकडून उद्धव ठाकरेंचा ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून उल्लेख ; ट्विट चर्चेत
- Raksha Bandhan Collection : ‘रक्षा बंधन’ चित्रपटाच्या कमाईत 25 टक्क्यांची घट, दुसऱ्या दिवशी ‘एवढेच’ कलेक्शन
- Uday Samant : “दादरमध्ये प्रति सेनाभवन नव्हे तर…”, उदय सामंतांचे स्पष्टीकरण