Supriya Sule । “अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

Supriya Sule

Supriya Sule । बारामती : राज्य सरकारने (State Govt) मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे जीआर सुपूर्द केला. यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Chhagan Bhujbal । छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले; “सरकार खोटं बोलत आहे”

बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राज्य सरकार हा अध्यादेश लवकरही काढू शकले असते, पण त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत यावं लागलं आणि मग या सरकारने अध्यादेश काढला, त्यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.(Supriya Sule vs State Govt)

Nitish Kumar Resigned । सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

“जे सरकार लिंगायत, मुस्लिम, धनगर समाजाला न्याय देईल, आम्ही त्यांच्यासोबत ताकदीने उभे राहू. जर त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. सरकारकडे राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहण्यासाठी वेळ नाही. ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Shivsena Pratod । गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे राजकारणात भूकंप, शिवसेनेचे प्रतोद कोण? भरत गोगावले की कुडाळकर?

Spread the love