
आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon sessions) सुरुवात होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांचे हे पहिले अधिवेशन असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) दोन्ही गटाकडून एकमेकांना व्हीप लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनच्या पहिल्याचे दिवशी राष्ट्रवादीतील दोन गटात संघर्ष पाहायला मिळेल. तसेच विरोधक सत्ताधारी पक्षांना घेराव घालू शकतात. (Latest Marathi News)
Rohit Pawar | धक्कादायक! रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
त्यामुळे आता हे अधिवेशन (Maharashtra Monsoon Sessions) सत्ताधारी की विरोधक गाजवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? कोणत्या विषयांवर चर्चा होणार? जाणून घेऊया सविस्तर.
- महिलांवर होणारे अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान, शेतमालाचे घसरणारे भाव
- अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा
- राज्यात घडणाऱ्या जातीय दंगली
- मंत्र्यांवर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप
पावसाचा कहर सुरूच! कुठे वाहने बुडाली, तर कुठे रस्त्याला भले मोठे खड्डे पडले
या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजू शकते. मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये बंड करत भाजपसोबत (BJP) युती केली. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत भाजपसोबत युती केली. राज्यात आता तीन पक्षाचे सरकार आले आहे. नाट्यमय घडामोडीनंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे आता या अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांवर भारी पडणार की विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Katrina kaif Birthday | कधीच शाळेत न जाणारी कतरिना आज घेते बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन
राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आणि कलंकित आहे असे म्हणत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. अशातच आता अजित पवार गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या आसनव्यवस्थेवरून नवीन पेच निर्माण झाला आहे.