
मोठी माणसे रागावतील किंवा एखादी गोष्ट करू देणार नाहीत ही भीती लहान मुलांना नेहमी असते. या भीतीमुळे बऱ्याचदा घरातल्यांना न सांगता काही गोष्टी करतात. मात्र नंतर याचे गंभीर परिणाम सोसावे लागतात. चंद्रपूर (Chandrapur) येथे अशीच एक घटना घडली आहे. येथील तीन शाळकरी मुले घरात न सांगताच पोहायला गेली आणि दुर्दैवाने तलावात बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे.
धक्कदायक! फिरायला नेतो सांगून वडिलांनीच जुळ्या मुलांना पाजले विष
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सुट्टीदिवशी ही घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात मोठा तलाव आहे. या तलावात या तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले आहेत. कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे असणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात ही मुले राहतात. दरम्यान सुट्टी असल्याने ही मुले घरात न सांगता पोहायला गेली होती.
उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत; म्हणाली, मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा
रात्री उशिरापर्यंत मुले घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध केली असता, या मुलांचे मृतदेह तलावात सापडले. ही तिन्ही मुले 10 वर्षे वयाची असून ती एकाच वर्गात शिकत होती. तलावाजवळ या मुलांच्या कपड्याचे जोड देखील आढळले आहेत. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.