Uddhav Thackeray । भाजप लग्नात 35 पुराणपोळ्या खाऊन नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक ठिकठिकाणी सभा, मेळावे घेताना आपल्याला मिळत आहेत. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)

Politics News । राजकीय वर्तुळात मोठा भूकंप! काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

जोगेश्वरी पूर्व परिसरात उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा पार पडली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, “भाजपची (BJP) वाईट सवय आहे. यांना लग्नातही बोलावू नये. हे 35 पुरणपोळ्या खाऊन नवरा बायकोचे भांडण लावतील. भाडोत्री जनता पक्ष मी एवढ्यासाठीच म्हणतोय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातील कोणीच नाही. सगळे आयात केलेले आहेत,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Jayant Patil । “…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही” जयंत पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य

“शिवसेनेचे काही गद्दार फोले म्हणून शिवसैनिक आपल्याकडे येतील, असं यांना वाटलं होत. पण तुम्ही अंधेरी जोगेश्वरी आणि उत्तर पश्चिम जिल्हा मतदारसंघातील पहा येथील एकही शिवसैनिक फुटणार नाहीत. तानाजी मालुसरे बाजीप्रभू हे नाव घेतल्यावर निष्ठावंत असं म्हटलं जातं. शेवटी गद्दार ते गद्दारच, हे का गेले ते माहीत नाही,” असाही चिमटा यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढला.

Ravindra Waikar । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! आमदार रवींद्र वायकर करणार शिंदे गटात प्रवेश

Spread the love