
देशातील सर्वाधिक लोकसंख्या भारतीय रेल्वेतून (Railway) प्रवास करते. उच्च वर्ग, मध्यमवर्ग आणि कमी उत्पन्न असलेले सर्व लोक रेल्वेचा वापर करतात. घरापासून दूर इतर शहरात काम करणाऱ्या लोकांसाठी रेल्वे हे प्रवासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. घरी किंवा कोणत्याही गरजेनुसार अनियोजित सुट्टीवर जाताना तत्काळ तिकीट बुकिंगची नेहमीच गरज असते. अशा परिस्थितीत, तत्काळ तिकीट बुकिंग निश्चित करणे ही सर्वात मोठी चिंता आहे.
Airtel: एअरटेलची शांतीत क्रांती! लाँच केला स्वस्त प्लॅन, जिओची डोकेदुखी वाढली
जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी जातो तेव्हा तपशील भरण्यास वेळ लागतो. जो व्यक्ती त्वरीत तपशील भरतो आणि पेमेंट करतो, त्याचे तिकीट कन्फर्म होते. दुसरीकडे या कामात वेळ काढणारे अनेकवेळा तिकीट काढण्यास मुकतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा हे तत्व येथे लागू होते. ज्याने आधी बुकिंग केले, त्याचे तिकीट कन्फर्म होते. आणि जे पहिल्यांदा तिकीट बुक करणार नाहीत त्यांना फायदा होत नाही.
Sharad Pawar:‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये’ शरद पवार यांचे मोठे वक्तव्य
अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते. यासाठी आधी एक गोष्ट काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांचे तपशील भरण्यासाठी लोक जास्तीत जास्त वेळ घेतात असे सामान्यपणे दिसून येते. त्यामुळे साईटवर आधीच दिलेली प्रवासी यादी सुविधेचा वापर करून ती तयार करून ठेवली, तर खूप वेळ वाचतो आणि तिकीट बुकिंगमध्ये खर्च होणारा वेळही वाचतो. अशा परिस्थितीत, स्मार्ट मूव्हसह, वापरकर्त्यास तत्काळ तिकीट बुक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनतर उर्वरित प्रक्रिया समान आहे.