मुंबई : आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chadha)रिलीज झाल्यानंतर आठ दिवसांनी फ्लॉप ठरला आहे. दिवसेंदिवस लाल सिंग चड्ढा यांची कमाई कमी होत आहे. पहिल्या तीन दिवसांत 27.96 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाला आता चांगले पैसे कमवता आलेले नाही.या चित्रपटाद्वारे आमिर खानने (Amir Khan)4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केले होते, मात्र लोकांनी या चित्रपटाला (movie)पूर्णपणे नाकारले.
Ajit Pawar: मुख्यमंत्री देखील जनतेतूनच थेट निवडून आणा – अजित पवार
दरम्यान आता लाल सिंग चड्ढाच्या अपयशावर अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आमिर खानवर हल्ला चढवला आहे.अनुपम खेर यांनी आमिर खानची जुनी चूक लक्षात आणून दिली आहे.चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी आमिर खानने स्वतःवर घेतली आहे. यामुळेच त्याने वितरकांचे नुकसान भरुन काढण्याचा निर्णय घेतलाय.
Asia Cup : आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीने ‘5 शब्दांत’ सांगितले किंग कोहलीचे भविष्य
नेमक काय म्हणाले अनुपम खेर
अनुपम खेर यांनी अमीर खानच्या बहिष्काराच्या ट्रेंडविषयी आपली प्रतिक्रिया दिली. “तुम्ही पूर्वी काही बोलले असेल, तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होईल. जर कोणाला वाटत असेल की त्यांनी ट्रेंड सुरू करावा, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. ट्विटरवर दररोज नवीन ट्रेंड येत असतात.”अस अनुपम खेर म्हणाले.
Mohit Sonkar : गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करताना सापडला भाजप नेता! कुटुंबीयांनी पाहिलं अन्…
ही आहे अमीर खानची चूक
अनेक वर्षांपूर्वी आमिरने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर वक्तव्य केले.ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आमिर खान म्हणाला होता की, त्याची माजी पत्नी किरण राव भारतात राहण्यास घाबरते. या विधानामुळे सर्वजण आमीरच्या विरोधात गेले.त्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्याला जोरदार ट्रोल केले. हे आजपर्यंत लोकांना आठवत आहे आणि ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत ट्विट करत आहेत.