राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा चिंतेत आहे. दरम्यान आज राज्याभर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बायकोचे दागिने गहाण ठेऊन लोकांना फुकट हेल्मेट वाटतोय ‘हा’ माणूस; मित्राचा अपघात झाला म्हणून…
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासांमध्ये पालघर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार,हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, नाशिक, सोलापूर, मुंबई, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात
सध्या दिवसा उन्हाचे चटके आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मागच्या काही दिवसांपासून हे असेच चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असे शेतकऱ्यांना आव्हान केले आहे.